Friday 7 November 2014

ऊर्मी

मनात
खळ्ळकन् निखळतं काहीतरी
कुणाच्या तरी प्रतिचे
भावनांचे, संवेदनांचे
जपून ठेवलेले अवशेष असतात ते...

काही पडलेले असतात तसेच
अनेक दिवसपर्यंत
मनाच्या पृष्ठभागावर
काही उचलले जातात
सावकाश, फुरसतीनं
काही काही अवशेष
उचलण्याची मात्र घाई होते
कारण
मनाला ऊर्मी बहाल करणारे
जादुगार असतात ते...

-भाग्यश्री पेठकर

(महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक 2014 विदर्भ आवृत्तीत प्रकाशित)

No comments:

Post a Comment